मूलभूत कर्तव्य. जबाबदारी की गरज?
वेळ असेल १०-१०.३०.... बदलापूर वरून डोंबिवलीला ट्रेनने येत होतो. उशीर झाल्याने ट्रेन तशी रिकामीच होती. बाजूलाच आमच्या एका कुटुंबाचे चाललेले संभाषण कानावर आलं.... देशाच्या सध्याच्या स्थितीवर, भविष्यावर त्यांचं संभाषण चालू होतं. चालली होती. काही राजकीय पक्षांची निंदानालस्ती... अचानक त्यातील एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस राजकीय पक्षांबद्दल बोलण्यास अडविले. त्या व्यक्तीने प्रत्युत्तर म्हणून मूलभूत हक्कांचा विषय काढला व त्यास अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आठवण करून दिली. मग संविधानातील मुलभूत हक्कांवर त्यांची चर्चा सुरू झाली. संभाषणादरम्यान त्यातील एका व्यक्तीने गुटखा चघळून लाल भडक झालेल्या तोंडातून आपल्या लाळेची पिचकारी अतिशय कलात्मक रीत्या ट्रेनच्या एका कोपऱ्यात मारली तर दुसऱ्याने संत्री व केळ्याचे साल काढून अगदी सहजरित्या ट्रेनच्या खिडकी बाहेर फेकून दिले. हे दृश्य पाहून मला आणि माझ्या मित्राला प्रश्न पडला की ज्या संविधानातील मूलभूत हक्कांविषयी ते बोलत होते त्याच संविधानाने आपल्याला काही ही मूलभूत कर्तव्ये सोपविली आहेत याचा त्यांना विसर कसा काय पडला? संविधानाने दिलेल्या कर्तव्याचे पालन करणे ह